“महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही”

0
429

पुणे,दि.७(पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते मावळमध्ये एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जोपर्यंत पाठबळ आहे तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही, असं मत पवार यांनी व्यक्त केलं.

“महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे अनेक नेते हे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही अशी टीका करत आले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र हे सरकार आपलं एक एक पाऊल रोवत पुढे जात असल्याच दिसत आहे,” असं पवार म्हणाले.

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष मयूर ढोरे, बापू भेगडे, कृष्णराव भेगडे, अर्चना घारे, बाबुराव वायकर, बबनराव भेगडे , माउली दाभाडे , संजोग वाघेरे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.