महाविकास आघाडीत काँग्रेस पोरकी, सोनिया गांधींकडे गाऱ्हाणे

0
294

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) : निधीवाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या नेत्यांनी पत्र लिहून काँग्रेस हायकमांडकडे भेटीची वेळ मागितल्याचे सांगितले जात होते. काँग्रेसच्या या नाराज आमदारांचे पत्र अखेर समोर आले आहे. हे पत्र पुण्यातील काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवरून लिहण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या गटाचे नेतृत्त्व संग्राम थोपटे हे करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सोनिय गांधी यांना पाठवलेल्या या पत्रावर एकूण २० आमदारांच्या सहया आहेत. या आमदारांनी ३ किंवा ४ एप्रिलला सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेस आमदारांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे.

राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या निधीवाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला झुकते माप दिले जाते. राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांना कमी निधी मिळतो. तसेच पक्षातील वरिष्ठ मंत्री आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. त्यामुळे हे आमदार आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापुढे आणखी काय गाऱ्हाणे मांडणार, हे पाहावे लागेल.

भाजपचं मिशन २०२४! महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्याचा प्लॅन ठरला, १२ प्रमुख शिलेदारांवर जबाबदारी
नितीन राऊत यांच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराज?
काँग्रेसच्या आमदारांनी आपल्या पत्रात अनेक समस्या उपस्थित केल्या आहेत. राज्य सरकारमधील काँग्रेसचे अनेक मंत्रीच आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. विशेषत: उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कारभारावर हे आमदार असमाधानी आहेत. तसेच काँग्रेसचे अनेक पालकमंत्री सक्रिय नसल्यामुळे त्याठिकाणी बदल व्हावा, अशी मागणीही नाराजांच्या गटाकडून करण्यात आली आहे.

पटोलेंनी भाजपवरच बॉम्ब टाकला
काँग्रेसचा कोणताही आमदार नाराज नाही. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत. मात्र भाजपमध्ये सर्वच आलबेल आहे का? त्यांचेही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि याबाबत योग्यवेळी माहिती देऊ, असा दावा नाना पटोले यांनी केला.