महाराष्ट्रात भाजप नंबर वन, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो; शिवसेनेला फटका शक्य

0
687

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यात चार केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक लढवली. त्यातील नितीन गडकरी सोडल्यास इतर मंत्र्यांच्या जागा धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप जिंकू शकेल, मात्र शिवसेनेच्या जागा घटू शकतील, असाही अंदाज आहे. राष्ट्रवादी पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकेल. विदर्भ व मुंबईत अपेक्षित यश मिळाले तर काँग्रेसही दोन जागांवरून दोन आकडी जागा गाठू शकते आणि तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते. शिवसेनेची मात्र चौथ्या क्रमांकावर घसरण होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीलाही एखाद्या जागेची लॉटरी लागू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.