कोल्हापूर, दि. १० (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर कोणताही कार्यक्रम घेऊन गेलेले नाहीत. ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, तर मतांची भीक मागायला गेले आहेत, अशी टीका स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ५ जागाही निवडून येणार नाहीत, अशी टीकाही यावेळी निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर कोल्हापुरात बोलताना केली.
दरम्यान, युतीची चर्चा गेली खड्ड्यात! पहिले माझ्या शेतकऱ्याचे काय करता ते बोला, अशी विचारणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीडमध्ये बोलताना केली. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरडी भाषणे आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला लगावला होता.