मुंबई,दि.२६(पीसीबी) – अयोध्या व राम मंदिराच्या प्रश्नावर मते मागण्याचं काम आता तरी थांबवा. रामाच्या हाती व मंदिराच्या कळसावर राजकीय पक्षाचा झेंडा फडकवू नका, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
अयोध्येची समस्या देशासमोरील मोठी समस्या ठरली. मात्र आता ही समस्या संपली आहे. हे सर्व मोदींच्या कारकिर्दीत घडलं आहे. पंतप्रधान मोदी पाकिस्तान, चीनच्या सीमेचा वाद मिटवू शकले नाहीत, पण अयोध्येतील सीमावाद त्यांनी मिटवला. त्याचे श्रेय न्यायालयालाच द्यावे लागेल, अशी बोचरी टीका राऊतांनी भाजप सरकारवर केली आहे, असं राऊत म्हणाले आहे.
दरम्यान, तसेच राममंदिराची उभारणी आपल्यामुळेच होत आहे असे भाजपने ठरवून टाकले. पण ज्यांनी राम मंदिराच्या लढ्याची हाक दिली. व अयोध्येच्या दिशेनं भाजपचा रथ नेला ते लालकृष्ण आडवाणी आज भाजप पक्षात कोठे आहेत? असा टोलाही यावेळेस राऊतांनी भाजपवर लगावला आहे.