भाजप शिवसेनेतील नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात; जयंत पाटलांचा दावा  

0
461

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा भाजप करत आहेत. मग त्यांना दुसऱ्या पक्षातील आमदार का फोडावे लागतात? असा सवाल करून जिथे कोणी पक्ष सोडून जात आहे तेथील भाजप  शिवसेनेतील स्थानिक नेते आमच्याही संपर्कात  आहेत, असा प्रति दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनगरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

यावर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना भाजप-शिवसेनेतील स्थानिक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.