भाजपची सत्तेची मस्ती जनताच उतरवेल – सुप्रिया सुळे

0
856

जळगाव, दि. ११ (पीसीबी) –  राज्यात भाजपचे आमदार आणि पदाधिकारी बेताल विधाने करत सुटले आहेत. तर आमदार मुलीना पळवून नेण्याच्या विधाने करत आहेत.  परंतु गृह खाते  त्यांच्यावर काहीही कारवाई करत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. आता भाजपला आलेली  सत्तेची मस्ती जनताच उतरवेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.  

जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या  कार्यालयात  कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुळे बोलत होत्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, राज्यात महिला असुरक्षित असून त्यांच्या मनात भितीची भावना आहे. त्यांना सरकार संरक्षण देऊ शकत नाही.  त्यातच  सत्ताधारी आमदारच मुलीना पळविण्याची भाषा करू लागले आहेत.  राज्यातील सरकार असंवेदनशील झालेले आहे. त्यांना सत्तेची मस्ती आली आहे. आता जनताच त्यांची मस्ती उतरवेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ ऑक्‍टोबरनंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल, असे म्हटले आहे.   जर दुष्काळाची स्थिती आहेच, तर मग तो जाहीर करण्यासाठी शासन उशीर का लावत आहे. दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे,  असाही आरोप सुळे यांनी यावेळी केला.