बोरघाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली

0
482

लोणावळा, दि.४ (पीसीबी) – मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर ४०  जण जखमी झाले आहेत.  कराड मुंबई बसचा अपघात झाला आहे. बसच्या चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस दरीत कोसळली. य अपघातात २ वर्षांचा एक मुलगा, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला असे चारजण जागीच ठार झाले. या ठिकाणी देवदूत संस्थेचे सदस्य, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस यांच्या साथीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

बोरघाटातील गारमाळ पॉईंटजवळ चालकाचा बसवरचा ताबा सुटला. ज्यानंतर हा अपघात झाला. सर्वज्ञा सचिन थोरात (वय ३- कराड), स्नेहा पाटील (वय-१५, घाटकोपर), जनार्दन पाटील (वय-४५), संजय शिवाजी राक्षे (वय-५०, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र या पाचजणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मिळते आहे.