“बुलेट ट्रेनसाठी राज्याचा पैसा वापरत नाही; राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही”

0
701

मुंबई,दि.४(पीसीबी) – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी राज्याचा पैसा वापरत नाही. राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सरकावर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी आमच्या कामाला स्थगिती देणं इतकंच काम सरकार करत आहेत. कोणतंही नवं काम ते करत नाहीत, असा टोला रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

आगामी काळात महाविकास आघाडीचं आव्हान समोर असेल असं विचारलं असता. महापालिकेत ते एकत्र येऊ शकत नाहीत. एकत्र आले तरी आव्हान नाही आणि वेगळे लढलो तरी आव्हान नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना दानवेंनी अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील टीका केली.

दरम्यान, आंदोलन करणाऱ्यांना सुधारित नागरिकत्व कायदा काय आहे? हे कोणी समजावून सांगितलेलंच नाही. हा निवडणुकीचा स्टंट आहे, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.