बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत – खा. सुप्रिया सुळे

0
457

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे. यावर विरोधकडून चांगलीच टिका होताना बघायला मिळत आहे. ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी सरकारविरोधात आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या  मुंबईमध्ये माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या.

तसेच बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. कठिण प्रसंगी कोणाच्याही मागे त्यांच्या कुटुंबातील सदस्य उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुणी गेले तर त्यावर टीका करू नये, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे.