औरंगाबाद, दि. २२ (पीसीबी) – विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचा पराभव झाला.
अंबादास दानवे यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची १०० मते फुटली. बाबुराव कुलकर्णी यांना १०६ तर शहानवाज खान यांना ३ मते व १४ मते बाद झाली .
दरम्यान, हा प्रामाणिकपणाचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया बाबुराव कुलकर्णी यांनी दिली आहे. तर अंबादास दानवे यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला.