औरंगाबाद विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवेंचा विजय

0
685

औरंगाबाद,  दि. २२ (पीसीबी) – विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना – भाजप युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी विजय मिळवला आहे.  काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी यांचा  पराभव  झाला.

अंबादास दानवे यांना ५२४ मते मिळाली. तर काँग्रेस व राष्ट्रवादीची १००  मते फुटली. बाबुराव कुलकर्णी यांना १०६ तर शहानवाज खान यांना ३ मते व १४ मते बाद झाली .

दरम्यान, हा प्रामाणिकपणाचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया बाबुराव कुलकर्णी यांनी दिली आहे. तर    अंबादास दानवे यांच्या  विजयाची घोषणा होताच शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला.