बंद दरम्यान मुंबईसह राज्यात दिवसभरात काय घडले

0
547

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांची दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले आहेत.

सायन-पनवेल हायवेवर आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्याने, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.  या संपूर्ण आंदोलनामुळे मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूने बंद आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी गाडीच्या टायरची जाळपोळ केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी टायरपासून आंदोलकांना बाजूला सारत जळालेले टायर विझवण्याचे प्रयत्न केले. ठाण्यातल्या माजीवाडा ब्रिजजवळही आंदोलकांनी गाड्यांचे टायर जाळले.

मानखुर्द – मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड केली आणि त्य़ानंतर बस पेटवली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली.

अहमदनगर – नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी वन विभागाची जिप पेटवली.

नाशिक – नाशिकरोड परिसरात आंदोलनाला हिंसक वळण.अनेक दुकानांसह एटीएमची तोड़फोड़ केली. बिटको पॉइंट,  दत्त मंदिर चौकात तोडफोड.

बारामती – संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी रस्ता रोको करत टायर जाळले, तर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. इंदापूरमध्ये ठिय्या आंदोलन, सुरवड गावी एस टी बस फोडली.