प्रियंकाकडे उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आणण्याची जबाबदारी – राहुल गांधी

0
350

लखनऊ, दि. ११ (पीसीबी) – प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशात काँग्रेसचे सरकार आणायची जबाबदारी सोपवली आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  सांगितले. आज (सोमवार) लखनऊ येथे प्रियंका गांधी यांचा रोड शो आणि रॅली आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना राहुल यांनी काँग्रेस कुठेही बॅकफूटवर नाही, तर फ्रंटफूटवर जाऊन खेळणार आहे, असेही म्हटले.  

राहुल गांधी म्हणाले की,  आपल्या देशाचा चौकीदार चोर आहे हे वास्तव आहे. मागील पाच वर्षात मोदींनी देशासाठी काहीही केले नाही. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन नुसते दिले. मोदींनी केवळ अनिल अंबानींचा फायदा करून दिला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याऐवजी मोजक्या उद्योगपतींचे कर्ज माफ गेले, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी छपन्न इंची छाती फुगवून बोलत नाहीत. तर आता त्यांची देहबोलीच बदलली आहे. भ्रष्टाचार केला आहे, हे त्यांची देहबोलीच सांगत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.  यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची नक्कलही करून दाखवली. मोदींनी फक्त त्यांच्या मित्रांचा फायदा करून दिला, असे ते म्हणाले.