पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पुण्यश्लोक प्रतिष्ठाणतर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ व्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील त्यांच्या पुतळ्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अशोक उकले, रामदास हाळनोर, हणमंत मोटे, अनिल सरक, सागर पालवे, सागर गडदे, रवी गोफणे, शाम हराळ, उन्मेष गोयकर आदी उपस्थित होते.
विलास महानवर म्हणाले की, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाभिमुख राज्यकारभार करून आपल्या राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला. अहिल्याबाई यांनी ज्या पद्धतीने समाजातील रंजल्या-गांजलेल्यांना न्याय देण्याचे प्रयत्न केला. त्याच पद्धतीने काम करण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.