पालखीच्या गर्दीत चोरी करणाऱ्या तिघांना अटक

0
387

देहु, दि. २५ (पीसीबी) – संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान गर्दीचा फायदा घेत पैसे, दागिने आणि वस्तू चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली.

सचिन मच्छिंद्र पवार (वय १८, रा. आष्टा फाटा, जि. अहमदनगर), अर्जुन शेषराव शिंदे (वय १८, रा. इंदिरानगर, ता.पार्थी जि. परभणी) आणि राजाराम साहेबराव शिंदे (वय २५, रा. सुमित्रानगर, माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी या तिघांविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देहु येथील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या सचिन, अर्जुन आणि राजाराम या तिघा चोरट्यांना गुन्हेशाखेच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखी दरम्यान मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडतात यामुळे भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे.