दिल्ली, दि.३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडून देण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर सगळीकडे मोदींच्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे.
This Sunday, thinking of giving up my social media accounts on Facebook, Twitter, Instagram & YouTube. Will keep you all posted.
— Narendra Modi (@narendramodi) March 2, 2020
याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या निर्णयाच स्वागत देखील केले आहे.
नरेंद्र मोदीजींनी सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत.काही भाजपाचे नेते सांगत आहेत की,जर मोदी साहेबांनी सोशल मीडिया सोडलं तर आम्ही ही सोडू.मोदी भक्तांनी जर सोशल मीडिया सोडलं तर देश शांत होईल.आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.#ModiQuitsSocialMedia @NCPspeaks @MumbaiNCP pic.twitter.com/2LljGSpEEJ
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 3, 2020
नवाब मलिक म्हणाले, इतर काही नेतेही सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहेत. जर साऱ्या भक्तांनी (मोदी समर्थक) सोशल मीडिया सोडला तर देशात शांतता येईल.
काल पंतप्रधान @narendramodi यांनी रविवारपासून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. काही @BJP4India नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियामधून बाहेर पडण्याचे सांगितले आहे. सर्व मोदी भक्तांनी देखील सोशल मीडिया सोडला पाहिजे.
– ना. @nawabmalikncp#SocialMedia pic.twitter.com/6XDnFMhZLK— NCP (@NCPspeaks) March 3, 2020