पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाच स्वागत करतो मी – नवाब मलिक

0
367
दिल्ली, दि.३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडून देण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केले. त्यानंतर सगळीकडे मोदींच्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे.

याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदींच्या निर्णयाच स्वागत देखील केले आहे.

नवाब मलिक म्हणाले, इतर काही नेतेही सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत आहेत. जर साऱ्या भक्तांनी (मोदी समर्थक) सोशल मीडिया सोडला तर देशात शांतता येईल.