पंतप्रधानांच्या हत्येचे षड्‌यंत्र रचणारे गजाआड जाणार – मुख्यमंत्री फडणवीस

0
341

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – कोरेगाव भीमा हिंसा आणि नक्षली कनेक्शनप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर केलेली कारवाई योग्यच होती, हे सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट झाले आहे. या कारवाईमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. देशाविरोधी कारवाई करणाऱ्या या पाचही जणांविरोधात आमच्याकडे सज्जड पुरावे आहेत. हे पुरावे न्यायालयात  सादर करण्यात येणार आहेत, असे सांगून  पंतप्रधानांच्या हत्येचे षडयंत्र रचणारे गजाआड जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला.