नोकरी आणि छोकरीही नाही, मोदींनी तरूणांना फसवले – धनंजय मुंडे

0
498

औरंगाबाद, दि. २७ (पीसीबी) – लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी दोन कोटी नोकऱ्या  देण्याचे आश्वसन दिले होते. तुम्हाला वाटले नोकरी नही मिलेगी तो, छोकरी कैसे मिलेगी आणि छोकरी नाही मिळाली, तर हम दो हमारे कैसे होगे. मात्र, तुमच्या सुखी संसाराचे स्वप्न भंगले आहे. मोदींनी देशातील ५५ कोटी तरूणांना फसवले आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.  

औरंगाबाद येथे  राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले,  मोदी बाबाने देशातील सव्वाशे कोटी लोकांना फसवले आहे. गाडीत पेट्रोल टाकून आपापले पहावे, तर ती सोय देखील मोदींनी ठेवली नाही. पेट्रोल शंभरी पार करायच्या तयारीत आहे.

सोशल मीडियावरील प्रचाराला जनता भुलली. मात्र, आता तुमच्या मनात असलेली आग येणाऱ्या काळात दिसली पाहिजे, सरकारच्या विरोधात पेटून उठलात तरच तुमच्या अंगात तरुणांचे रक्त असल्याचे सिध्द होईल. कारण तरूणांची फळी मजबूत असेल, त्या पक्षालाच देशात आणि राज्यात सत्ता मिळवता येईल, असे मुंडे म्हणाले.