निवडणुकीतील आश्वासने पूर्ण न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होणार; निवडणूक आयोगाचा निर्णय

722

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – निवडणुकीपूर्वी मतदारांना विविध आश्वासने देऊन सत्तेत आल्यावर ही आश्वासने पूर्ण न करणाऱ्या राजकीय पक्षांना आता निवडणूक आयोग झटका देणार आहे. दिलेली आश्वासने न पाळणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अध्यादेश जारी केला आहे.