नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेनाच – संजय राऊत

0
238

मुंबई, दि. १० (पीसीबी) संजय राऊत म्हणतात, उद्या कमी जागा असताना नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेच तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल. कारण बिहार मध्ये भाजपाला जास्त जागा आहेत आणि जनता दलाला खूपच कमी जागा आहेत. अशाही परिस्थितीत भाजपाने जनता दलाचे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेच तर, महाराष्ट्रातील सत्तेची अदलाबदल हे त्यामागचे खरे कारण आहे. शिवसेनेला दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील सत्ता गेली हे त्रिवरा सत्य आहे. तसे होऊ नये म्हणून नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले जाईल, अन्यथा दुसरे पर्याय पुढे येऊ शकातात.