नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे १ सप्टेंबरला भाजपमध्ये विलिनीकरण

0
499

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण होणार आहे. राणे १ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून  भाजपमध्ये प्रवेश  करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्ताला  दस्तुरखुद्द  राणे यांनी पुष्टी दिली आहे.

भाजपने नारायण राणे यांना राज्यसभेची खासदारकी  दिली आहे.  मात्र, राणे यांनी अधिकृतरित्या  प्रवेश केलेला  नाही.  दरम्यान, राणे यांनी आगामी १० दिवसांत निर्णय घेऊ, असे सूचक  विधान केले होते. १० दिवसांनतर मी भाजपात असेन की माझा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चालवायचा यासंबंधी निर्णय घेईन, असे नारायण राणे यांनी सांगितले होते.

भाजपने मला काही कमिटमेंट दिल्या आहेत. त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री यासंबंधी चार पाच दिवसांत मला सांगतील. त्यानंतर मी निर्णय घेईन. दरम्यान,  त्यांनी प्रतिक्षेलाही काही  मर्यादा असते,  सांगून नाराजी व्यक्त केली होती.