नागरिकांनी जीव धोक्यात घालून कुठेही प्रवास करू नये – राज्यपाल

0
510

 

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – कोरोनामुळे देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन व रोगाच्या भितीने कामगार, नोकरदार, बॅचलर , इतर राज्यातील नागरिक हे गावाकडे परतण्यासाठी गडबड करत मिळेल त्या वाहनाने, जमेल तस, अगदी पायी, दुधाच्या टँकर मधुन ,रुग्णवाहिकेतून प्रवास करताना आज दिसून आले.

राज्यातील सर्वच नेत्यांसह आज राज्यपालांनी देखील अश्या नागरिकांचे स्थलांतर थांबवून त्यांची सोय करण्याचे निर्देश दिले असून, नागरिकांनी जीव धोक्यात घालून कुठेही प्रवास करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.