‘नाईट लाईफ’ तरुणांना बिघडविणारी; गुंडगिरी वाढविणारी; स्त्रियांसाठी असुरक्षित व्यवस्था ठरेल

0
300

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात २४ तास आस्थापना सुरू ठेवण्याचे; रात्रभर हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्याची व्यवस्था सुरू करण्याचा तत्वतः निर्णय राज्य सरकार ने मंजूर केला आहे. मात्र ही चोवीस तास शहर सुरू ठेवण्याची व्यवस्था तरुणांना बिघडविणारी; गुंडगिरी वाढविणारी; स्त्रियांसाठी असुरक्षित व्यवस्था ठरेल त्यामुळे या नाईट लाईफ व्यवस्थेला रिपब्लिकन पक्षाचा विरोध असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.