‘नाईकांनी शिवसेना सोडली तेव्हा कोणी त्यांच्या बापाचा उध्दार केला नव्हता – अवधूत वाघ

0
463
मुंबई, दि.१२ (पीसीबी) – बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप, शरद पवार, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर केली होती.
याचाच धागा पकडत एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार साहेबांची गणना देखील तुम्ही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का? असा प्रतिप्रश्न गणेश नाईक यांनी केला.
जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या वादात भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी उडी घेतली आहे. याबाबत ट्वीट करत अवधूत वाघ यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला. ट्वीट मध्ये अवधूत वाघ म्हणाले, ‘नाईकांनी शिवसेना सोडली तेव्हा कोणी त्यांच्या बापाचा उध्दार केला नव्हता,’ असे ते म्हणाले.