थरारक: आळंदीत उसणे घेतलेले पैसे परत न केल्याने एकाचा कडकडून घेतला चावा

0
512

आळंदी, दि. २ (पीसीबी) – हात उसणे घेतलेले पैसे लवकर परत करत नसल्याच्या रागातून एकाच्या गालाचा कडकडून चावा घेत त्याच्या पत्नीला शीवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार (दि.३०) रात्री साडेआठच्या सुमारास आळंदीतील कोयाळी या गावात घडली.

अमोल पांडुरंग पवळे (वय ३५, रा. कोयाळी) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार, संदीप रंगनाथ गायकवाड आणि रंगनाथ किसन गायकवाड (दोघे रा. रानमळा कोयाळी) या दोघांविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल याने काही दिवसांपूर्वी आरोपी संदीप याच्याकडून काही पैसे उसणे घेतले होते. ते पैसे परत करण्यास अमोल याला वेळ लागत होता. यामुळे रागावलेल्या संदीप आणि रंगनाथ या दोघांनी अमोल आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. तसेच काठीने मारहाण करत संदीप याने अमोलच्या गालाचा कडकडून चावा घेतला. यामध्ये अमोल गंभीर जखमी आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आळंदी पोलीस तपास करत आहेत.