…तर राम मंदिरासाठी पुन्हा कधीच कायदा करता येणार नाही – संजय राऊत

0
700

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राम मंदिरासाठी आज कायदा बनवला नाही, तर तो पुन्हा कधीच करता येणार नाही. आज आपल्याकडे बहुमत आहे. २०१९ मध्ये काय होईल ? हे  सांगता येत नाही. राम मंदिर श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे न्यायालयात यावर तोडगा निघेल, असे वाटत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. हा राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच राजकीय इच्छाशक्ती दाखवून हा प्रश्न सोडवू शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

यावेळी राऊत यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही हल्ला चढवला. ओवेसी यांनी हैदराबाद पर्यंतच मर्यादित रहावे. मंदिर  अयोध्येत बांधले जाणार आहे. हैदराबाद, पाकिस्तान आणि इराणमध्ये बांधले जाणार नाही, अशी टीका करत ओवेसींसारखे लोक मुस्लिम समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या समाजाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.