मुंबई, दि. २० (पीसीबी) – राम मंदिरासाठी आज कायदा बनवला नाही, तर तो पुन्हा कधीच करता येणार नाही. आज आपल्याकडे बहुमत आहे. २०१९ मध्ये काय होईल ? हे सांगता येत नाही. राम मंदिर श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे न्यायालयात यावर तोडगा निघेल, असे वाटत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.