…तर मंत्र्यांना नागडं करून हाणल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

0
400

नाशिक, दि. २८ (पीसीबी) –  राज्यातील भाजप सरकारने  तातडीने  दुष्काळ जाहीर करावा.  त्याचबरोबर कांद्याला  नुकसान भरपाई  देण्यात  यावी. नाही तर एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देणार नाही, जर चुकूनजरी कुठला मंत्री फिरताना दिसला तर मंत्र्यांना नागडं करून हाणल्याशिवाय राहणार नाही, असा  सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार)  येथे दिला.