…तर मंत्र्यांना नागडं करून हाणल्याशिवाय राहणार नाही – राजू शेट्टी

0
767

नाशिक, दि. २८ (पीसीबी) –  राज्यातील भाजप सरकारने  तातडीने  दुष्काळ जाहीर करावा.  त्याचबरोबर कांद्याला  नुकसान भरपाई  देण्यात  यावी. नाही तर एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देणार नाही, जर चुकूनजरी कुठला मंत्री फिरताना दिसला तर मंत्र्यांना नागडं करून हाणल्याशिवाय राहणार नाही, असा  सज्जड इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार)  येथे दिला.

नाशिक येथे  शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना  संबोधित केले.  यावेळी त्यांनी राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर कडाडून हल्ला चढवला. भाजप सरकार  शेटजी-भटजीचे विश्वासघातकी सरकार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तरी निघण्यासाठी   सरकारने कायदा  केला पाहिजे.  ही सरकारचीच जबाबदारी  असल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि  विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली.  आमचा कोणत्याही पक्षावर   विश्वास राहिलेले नाही. आता  थेट लोकसभेत कायदा  केला पाहिजे,  असेही  शेट्टी म्हणाले.