ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही – राजू शेट्टी

0
570

बुलढाणा,दि.८(पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा गावातील ५ लोकांनाही मिळत नाही, असं म्हणत सरकारवर बोचरी टीका केली आहे. तुम्हाला द्यायचं नसेल तर लोकांना फसवता का? असा सवालही राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे. ते बुलढाण्यातील जळगाव जामोद याठिकाणी बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. मात्र, या कर्जमाफीवर अनेकांनी टीका केली आहे. यातच कर्जमाफीवरुन सरकारवर शेट्टी यांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात दररोज १० शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. याची तुम्हाला लाज वाटालया हवी, अशी कडवट टीकाही शेट्टी यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला असल्याचं ते म्हणाले आहेत.