ग्रामीण भागातील सर्व अतिक्रमणे नियमित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
689

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – गावांगावातील सरकारी जागेवरील अतिक्रमण हा प्रश्न ज्वलंत झाला होता. हा प्रश्न सोडवणे गाव कारभाऱ्यांची मोठी डोकेदुखी झाली होती. मात्र, आता  ग्रामीण भागातील सरकारी जागेवरील सर्व अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वीची सर्व बांधकामे नियमित केले जाणार आहेत. या निर्णया मुळे ग्रामीण भागातील अतिक्रमणांच्या प्रश्नावरून निर्माण झालेले वाद निकालात निघणार आहेत.