खिळे जुळवण्याचा काळ गेला, खिळे मारण्याचा काळ सुरू – उद्धव ठाकरे

0
427

मुंबई,दि.६(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “खिळे जुळवण्याचा काळ आता गेला, खिळे मारण्याचा काळ आता सुरू झाला. विरोधकांनाही त्याची खात्री पटली असेल की आता सगळं कठीण आहे” असा टोला भाजपला लगावला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचा वार्षिक पुरस्कार सोहळा आज पार पडला. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांचा मुलगा, प्रबोधनकारांचा नातू यामुळे पत्रकारिता ही आमच्या घराण्यात आहे. राजकारणात आल्यावर घराणेशाहीवर टीका झाली. पण काही काळ मीही सामनाचा संपादक होतो. आता हे स्विकारल्यामुळे ते सोडावं लागलं,

उद्धव ठाकरेंनी यावेळी महिलांवरील अत्याचारांच्या घटानांवर देखील भाष्य केलं आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांनी कायदे केले तसा कायदा आणायचा का? नेमका तो कायदा कसा आणायचा याबाबत अभ्यास सुरू आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.