मुंबई, दि. ८ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धमकीचे फोन आले आहेत. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या कार्यकर्त्यांकडून हे फोन आले आहेत, असा दावा रामदास कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार संभाजी राजे यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर कदम यांना संभाजीराजे यांच्याकडून धमकीचे फोन आले असावेत, असे बोलले जात आहे.