“कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत…”

0
312

अयोध्या, दि.१७(पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील शाब्दिक वाद शिगेला पोहचला असताना उद्धव ठाकरेंनी अयोध्येते येऊ नये, असं अयोध्येतील संतांनी त्यांना म्हटलं होतं. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

चंपत राय यांनी ठाकरेंना अयोध्यते येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान देत “कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत… कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, कंगणा राणावतच्या कार्यालयावर या वादानंतर बुलडोझर फिरवला गेला. आता याच पार्श्वभूमीवर “उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये’, अशी घोषणा केली होती. जर ते आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागेल”, असं म्हणत विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंना इशारा दिला होता.