कुछ दिन क्या साथ रहकर गए वो, जाते जाते औकात बता गए लोग – नवाब मलिक

0
662

मुंबई, दि.२८ (पीसीबी) –विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील भिंतींवर लिहिलेल्या मजकुरावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शेरोशायरी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

कुछ दिन क्या साथ रहकर गए वो, जाते जाते औकात बता गए लोग असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आम्ही महिन्यापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेलं होतं. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेलं नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.