आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे प्रत्युत्तर,बरनाॅल’ जपून ठेवा, सहा महिन्यांनी याची तुम्हालाच गरज

0
370

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – भाजपला सत्ता गेल्याचं दु:ख झालं आहे. त्यांचं दु:ख मी समजू शकतो. पण बरनाॅल द्या असं म्हणणार नाही, असं म्हणत युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती.

या बोचऱ्या टिकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बरनॉल शिवसेनेने जपून ठेवावे, काही महिन्यानंतर तुम्हालाच त्याची गरज लागेल, असे प्रत्युत्तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिले आहे. शिवसेनेने पाठित खंजीर खूपसण्याचे काम केले आहे. भाजप-शिवसेना युतीला राज्यातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनाच ‘बरनॉल’ जपून ठेवावा लागणार आहे. कारण कधी त्यांच्या सत्तेत आग लागेल ते कळणार नाही, असे लाड म्हणालेत.