‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार;

0
428

सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर नुकतेच काही धर्मांध मुसलमानांनी अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केले होते. जागृत हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर ते हटवण्यात आले; मात्र अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘कुलाबा किल्ल्या’वर देखील झाल्याचे उघड झाले आहे. या किल्ल्यावर अनधिकृत मजार उभारण्यात आली असून तिला पांढर्‍या रंग देण्यात आला आहे. अशा छोट्या अनधिकृत मजारींचे रुपांतर नंतर दर्ग्यात आणि पुढे जाऊन मशिदींमध्ये केले जाते. बेकायदेशीर बांधकामांद्वारे हे भूमी हडपण्याचे एक तंत्र असून हे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग’ यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई विभाग, तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. या वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या साहाय्यक पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्रीमती फाल्गुनी काटकर यांनी कुलाबा किल्ल्यावर आमचे अधिकारी जाऊन आले असून ते दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहेत, असे आश्‍वासन दिले.

या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागात समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक, राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री. रोशन जंगम-बेलसेकर आणि श्री. राहुल आस्कट यांनी, तर मुंबईचे जिल्हाधिकारी श्री. राजीव निवतकर आणि रायगडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना समितीचे सर्वश्री सतीश सोनार, मंजुनाथ पुजारी, सौ. विशाखा आठवले, अवधूत बने, गिरीश जोशी आणि उदय तेली यांनी निवेदन दिले.

कुलाबा किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे; तसेच राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, अशी मागणी केली. पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी हे अतिक्रमण न हटवल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणीही समितीने दिली आहे.

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले, तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेत, असेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.