काँग्रेसला आम्ही सत्तेत येऊच देणार नाही – रामदास आठवले

0
540

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे मोठा जनाधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेने बहुमतात निवडून दिले आहे. पुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचेच सरकार असेल, असे सांगून काँग्रेसला आम्ही सत्तेत येऊच देणार नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत म्हटले आहे.  

लोकसभेच्या  अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची आज (बुधवार) निवड करण्यात आली. त्यानंतर आठवले यांनी आपल्या कवितेतून  बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. निवडणुकीपूर्वी अनेकदा काँग्रेसने आपल्याला त्यांच्यासोबत येण्याची विनंती केली होती. परंतु हवा कोणत्या दिशेने जात हे मी अचूक ओळखले आणि भाजपासोबतच राहण्याचा निर्णय घेतला, असे आठवले यांनी सांगितले.

जनतेने सरकारला कौल दिला आहे. त्यामुळे विरोधकानीही सभागृहाच्या कामकाजात सत्ताधारी पक्षाला मदत करावी, अशी विनंतीही आठवले यांनी केली.  तसेच आपले सरकार सर्व राज्यांना समान न्याय देईल. पुढील पाच काय तर वर्षानुवर्ष आमचेच सरकार येत राहिल. आम्ही काँग्रेसला सत्तेत येऊच देणार नाही, अशी खोचक टिप्पणी त्यांनी यावेळी केली.