एका हातात विष, दुसऱ्या हातात अमृत, काय घ्याल? उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सवाल

0
1003

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – भाजपसोबत युती करायचे की नाही यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची शुक्रवारी मुंबईत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी तुमच्या एका हातात विषाचा प्याला आहे, दुसऱ्या हातात अमृताचा, तुम्ही कोणता घ्याल? असा भावनिक सवाल केला. त्यावर सर्व खासदार आणि आमदारांनी तुम्ही जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असेल, असे उत्तर दिले. त्यामुळे शिवसेना लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती न करता स्वतंत्र लढेल, असा कयास बांधला जात आहे.