एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाच्या गोंधळावर बघा काय म्हणतात?

0
377

जळगाव, दि, २४ (पीसीबी) – विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्री कोणाचा असणार यासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यावर भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री पदावरून चाललेल्या गोंधळावर भाष्य करताना खडसे यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘आमचे ठरलंय’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. पण नेमके काय ठरलंय हे त्यांनी स्पष्टपणे सांगायला हवे. याबाबत स्पष्टता आल्यास कार्यकर्ते आणखी जोमाने काम करतील, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री पदावर ठामपणे दावा करत आहेत. तसेच भाजप – सेनेचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयनेही मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे