मुंबई, दि. २२ (पीसीबी) – उस्मानाबादमध्ये ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाने आज (सोमवार) पत्रकार परिषदेत दिली. जानेवारी २०२० मध्ये साहित्य संमेलन होईल. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेण्याची मागणी होत होती.
मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे, यासाठी मराठवाड्याच्या साहित्य परिषदेच्या शाखेचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यावा यश आले आहे.
दरम्यान,साहित्य संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून मागणी करण्यात आली होती. मात्र, यामध्ये उस्मानाबादला साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे.