इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव

0
414

बर्मिंगहॅम, दि. ४ (पीसीबी) – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला . विराट कोहलीचे अर्धशतक विजयापर्यंत संघाला पोहचवू शकले नाही. तो बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी गडगडली. मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव १६२ धावांत गुंडाळला. या विजयामुळे पाच कसोटी मलिकेत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळाली.