आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचा शेतीशी काय संबंध – अजित पवार

0
514

जुन्नर, दि. ६ (पीसीबी) – आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचा शेतीशी काय संबंध असा सवाल माजी  राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी राज्य सरकारला केला आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवसाच्या जुन्नर येथील पहिल्या सभेत अजितदादा बोलत होते.

शिवसेना पीकविम्यासाठी मोर्चा काढत आहे. तुम्ही सरकारमध्ये आहात ना मग हा रडीचा डाव का खेळताय ? सरकार ज्याच्याकडे असते त्याकडे जरब पाहिजे. परंतु, यांच्यामध्ये ती धमकच नाही असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.

अल्पसंख्याक शेतकरी, महिला, मागासवर्गीय यांना संरक्षण देण्यास हे सरकार फेल ठरले आहे. त्यामुळे आता यांना घालवणे गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.या सरकारची नजर सामान्यांच्या खिशावर आहे. ते फक्त मुठभर लोकांसाठीच आहे असा आरोपही त्यांनी केला.राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री, मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला. त्याचवेळी माझ्या मतदारसंघातही पूरपरिस्थिती आहे. तिथे नसतो आलो तर माध्यमांनी उलटसुलट बातम्या लावल्या असत्या. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. म्हणून मी काही पदाधिकाऱ्यांना तिकडे जबाबदारी सोपवली आहे, असेही त्यांनी सांगितले.