औरंगाबाद, दि. १० (पीसीबी) – पुढची टर्म मीच मुख्यमंत्री असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस अजूनही स्वप्नातच आहेत का? असा उपरोधिक टोला मारणारे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अजित पवारांना आता तेवढंच काम उरलंय’ अशा शब्दांत आज (बुधवार) प्रत्युत्तर दिले आहे.
औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. संविधान बचाव, देश बचाव या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.या टीकेला मुख्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर दिले आहे.
दरम्यान, राज्यात दुष्काळाची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, परंतु लातूरमध्ये २०१९ चा मुख्यमंत्री मीच हे सांगायला मात्र त्यांना वेळ आहे, ते अजूनही स्वप्नातच आहे का? अशी टीका अजित पवारांनी केली होती.