आज आपल्या बापाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय, तो पवार साहेबांमुळेच – अमोल कोल्हे

0
657

अहमदनगर, दि. ७ (पीसीबी) – आज संपूर्ण राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते. मात्र अजितदादांनी यांची जाणीव करून दिली आणि आज मुख्यमंत्र्यांनी आपली यात्रा स्थगित केली. आज काही लोक सोशल मीडियावर खा. शरद पवार साहेबांनी काय केले, असे प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रातप्रथम क्रमांकावर आहे, आज भारत निर्यातदार देश बनला आहे, आज आपल्या बापाच्या चेहऱ्यावर जे सुख दिसतंय, ते पवार साहेबांमुळे दिसत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज भाजप-शिवसेनेवर केली आहे.

यावेळी पवार यांनीही सरकारच्या कामकाजाचा समाचार घेतला. आज, शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं अहमदनगर शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी नगरच्या जनतेनं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हा माझा शब्द आहे, यांनी आज व्यक्त केले.