मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर आहे – रामदास आठवले

0
309

मुंबई,दि.१५(पीसीबी) – मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले राजस्थानातील राजकीय घडामोडी पाहता म्हणाले, की मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता राजकीय उलटफेरांसाठी महाराष्ट्राचाच नंबर आहे. त्याचबरोबर आपण सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. मंगळवारी एक व्हिडिओ मेसेज आठवले यांनी जारी केला. त्यामध्ये लवकरच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून या ठिकाणी भाजप सरकार स्थापित करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सन्मान होत नव्हता. अपमान होत असल्याने सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन योग्य निर्णय घेतला आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.