दिल्ली, दि. २० (पीसीबी) – रिलायन्स कम्युनिकेशनचे चेअरमन अनिल अंबानी आणि २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने अंबानी यांना एरिक्सन कंपनीचे थकवलेले ४५३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हे पैसे दिले नाही, तर अनिल अंबानींसह इतर २ संचालकांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.