महाराष्ट्र, दि.७ (पीसीबी) – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आठवडा होऊन गेला तरी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले नाही. खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीने सबुरीचे धोरण स्वीकारले असून, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी सुरू केली आहे.
शरद पवार आज दिल्लीवरून मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचे वाटप अद्यापी झालेले नाही. त्यामुळे पवार व ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर चर्चा केल्याचे समजते.