अजितदादांची डोकेदुखी वाढली; मावळ, शिरूरमध्ये प्रचार न करण्याचा काँग्रेसचा निर्धार

0
459

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचाराला धुमधडाक्यात सुरूवात केली असली, तरी मित्रपक्ष काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने अजितदादांची डोकेदुखी वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीमुळेच राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष झिरो झाला, हे वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे केसाने गळा कापणारा पक्ष असल्याचा काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कामापुरते जवळ करून नंतर राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी विचारपूस सुद्धा करणार नाहीत, असा ठाम विश्वास वाटत असल्याने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारात जायचे नाही, असा निर्धार केला आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीची वाट बिकट होताना दिसत आहे.