औरंगाबाद, दि. ९ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा मुस्लीम ‘अजेंडा’ ठरविण्यासाठी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मौलवी आणि उलेमांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुस्लीम मते त्या धर्मातील राजकीय नेत्यांच्या हातात नाहीत, तर ती मौलवींच्याच हातात आहेत असा दावा केला आहे .
लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरमध्ये काही मौलवींनी मुस्लीम मते काँग्रेसकडे वळविली . त्यावेळी या निवडणूक क्षेत्रात ‘एमआयएम‘चे नेते असदोद्दीन ओवेसी, अकबरोद्दीन ओवेसी यांना पुरेसा वेळ देता आला नव्हता. त्याचा फटक वंचित आघाडीला मिळाला आहे. परिणामतः आघाडीला मुस्लिम मते कमी मिळाली .